सहकारी संस्थेचा कायदा -सदर क्रमांक:-113

0

मुबंई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ग्राहक साक्षरता अभियान

विषय: आमची सोसायटी २००१ मध्ये स्थापन झालेली आहे. आम्हा सर्वाकडे रजिस्टर्ड करारनामे आहेत। सोसायटी स्थापन झालेली असली तरी सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स डिम्ड झालेले नाही. आता मूळ मालक व विकसक मयत आहेत तेव्हा कन्व्हेयन्स डिम्ड कसे करता येईल?

उत्तर: डिम्ड कन्व्हेयन्सचा कायदा येण्याचे कारण असेच आहे की, जेथे विकासक अथवा मूळ मालक हयात नाहीत, अशा बाबतीत सोसायट्यांचे कन्व्हेन्स डिम्ड अडून राहू नये. म्हणून डिम्ड कन्व्हेयन्स प्रचलित कायद्यानुसार सोसायटीला विहित नमुन्यात सक्षम अधिकारी (डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागतो. अर्ज दाखल करून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विकसकाच्या पत्त्यावर नोटीस पाठवली जाते. त्यानंतर नोटिशीला जर प्रतिसाद मिळाला नाही, तर कायद्याप्रमाणे पुढील कारवाई होऊन एक तर्फा सुनावणी होते व सुनावणीअंती डिम्ड कन्व्हेयन्सचा निर्णय घेण्यात येतो. डिम्ड कन्व्हेयन्स म्हणजेच सोसायटीच्या नावे खरेदीखत झाले असे सक्षम अधिकाऱ्याकडून ठरवून मिळते. त्यासाठी विकसित अथवा मूळ मालक हयात नसतील तर कायद्याप्रमाणे निर्णय घेता येतो.

लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप/पेज (https://www.facebook.com/groups/485736278978687/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here