मनमाड : देशात निर्माण झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रभावा मुळे देशातील संपूर्ण रेल्वे सेवाच इतिहासात पहिल्यांदाच थांबण्यात आली होती. रेल्वे सेवा थांबल्याने संपुर्ण देशातीलच अनेक प्रवासी नागरिकांना या काळात खुप अडचणी सहन कराव्या लागल्या होत्या.परंतु आता भारतीय रेल्वे मंडळ हे टप्या-टप्या ने देशातील आणि राज्यातील रेल्वे सेवा सुरू करून पूर्वी प्रमाणे रेल्वे रुळावर येत आहे.
मनमाड ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची रोजची जीवन वाहिनी असणारी “पंचवटी एक्सप्रेस” ही आज पासुन सुरू झाली . तब्बल पाच-साडेपाच महिन्यांच्या विश्रांती नंतर आज मनमाड हुन मुंबई च्या दिशेने पंचवटी एक्सप्रेस रवाना झाली.आज गाडी सुरु झाली असुन यात फक्त आरक्षण करूनच प्रवास करता येणार आहे.सर्व साधारण तिकीट आणि मासिक पास काढून प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे,