मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे विश्व पटलावर भारताची प्रतिमा उंचावली :- डॉ. भारती पवार

0

लासलगाव : मोदी@९ अंतर्गत लासलगाव येथे संयुक्त मोर्चा संमेलन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडले.सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी समर्पित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा नऊ वर्षाचा कार्यकाळ हा खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणार आहे. भारतीय जनता पक्षाने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा नारा देत जनसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला असून आज सर्व समाज घटकातील नागरिक सरकारचे गुणगान गात आहेत. आज शेतकरी, कामगार, आर्थिक दुर्बल घटक आणि महिलांसाठी विविध योजना सरकारच्या वतीने राबविण्यात येत असून या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे यावेळी डॉ. भारती पवार यांनी सांगितले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा प्रभारी राजेंद्र कुमार गावित, जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर,सुनील बच्छाव, सुवर्णा जगताप,डि. के.नाना जगताप, निलेश सालकाडे,कैलास सोनवणे, गोविंद बोरसे, अण्णासाहेब डोंगरे, जलील अन्सारी ,राजेंद्र चाफेकर, रंजना शिंदे, संपत नागरे,सोपान दरेकर, किरण कुलकर्णी, महेश गिरी,संजय गाजरे, आनंद शिंदे, बाळासाहेब रायते, देवराम रायते, रामा भोसले, वसंत गुजर, निलेश जगताप, विष्णू ढोमसे, श्रीकांत खंदारे, रूपाताई केदारे, शैलजा भावसर, सौ.शर्मा, दत्तूलाल शर्मा, नितीन शर्मा, शिवम शिंपी, अरबाज शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सागर शिंदे,रामा भोसले सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here