नवीन होणाऱ्या रेल्वे लाईन लागत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या विषयावर आ.सुहास आण्णा कांदे यांनी केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्याशी चर्चा

0

कलवाडी: नवीन होणाऱ्या रेल्वे लाईन लागत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या विषयावर आ.सुहास आण्णा कांदे यांनी केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्याशी चर्चा केली.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती ताई पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या मागणीवर चर्चा केली. तिसरी रेल्वे लाईन लागत असणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य भाव मिळावा म्हणून लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्य मंत्री,केंद्रीय मंत्री डॉ.भारतीताई पवार तसेच संबंधित शेतकरी बांधवांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढू असे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले. कळवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. भारती ताई पवार या उपस्थित होत्या.
या बैठकीत शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गडगे, शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, माजी नगरसेवक कैलास दरगुडे रामनाथ सानप कैलास सानप रमेश दरगुडे नामदेव दरगुडे मच्छिंद्र दरगुडे संतोष दरगुडे रवींद्र दरगुडे दीपक दरगुडे संतोष गांगुर्डे सचिन दरगुडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here