सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे:- डॉ भारती पवार

0

पेठ : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी ता.पेठ येथे आयोजित जनता दरबारात उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला व जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेऊन या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली यावेळी जलजीवन मिशन,रस्ते, वनविभाग,कृषी विभाग, लघुपट बंधारे, आरोग्य विषयक अशा या बाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली तसेच तक्रारींची त्वरीत दखल घेवून त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. यावेळी संजय वाघ, प्रशांत भदाणे,विजय देशमुख,रामदास वाघेरे, काशिनाथ भडांगे,अरुण माऊली, दिलीप पाटील, विलास जाधव, गणेश गवळी,सागर ढोगमाने, रमेश गालट, चिंतामण महाले,बाळू गायकवाड, विशाल जाधव,राजेंद्र गवळी, श्याम काळे, केशव कुवर, गोरख भांगरे, तुकाराम चौधरी, सुभाष चौधरी, विशाल जाधव, तसेच प्रांत निलेश अपार,तहसीलदार अनिल पुरे ,गटविकास अधिकारी सुहास शिंदे मुख्याधिकारी नगर पंचायत ऋषिकेश पाटील,पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार, पाणीपुरवठा विभाग सचिन जाधव आदींसह नागरीक या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here