मी मनापासून आभारी आहे :जयेंद्र दादा खुणे (प्रदेशाध्यक्ष, मुंबई,आगरी सेना )

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्राचे *महामहीम राज्यपाल श्री.भगत सिंग कोश्यारी* महोदयांनी *मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यास मुंबई आर्थिक राजधानी उरणार नाही* अशी स्तुतीसुमने मुंबईच्या राजधानीबद्दल केली. खरोखरच त्यांनी हे केलेले व्यक्तव्य योग्यच आहे. *त्यांनी खरोखरच गुजराती आणि राजस्थानी उद्योगपतींना मुंबईतून हद्दपार करावेच* .कारण त्यांचाच मुळे तर आज *मुंबईतील भूमिपुत्र हा नैसर्गिक साधन संपत्तीवर जगणारा आगरी कोळी देशोधडीला लागला आहे.* उद्योगपतींच्या खिसे भरू विकासाच्या नावाने मुंबईतील भूमिपुत्र बरबाद झालेला आहे.यापुढे *भूमिपुत्रांची होणारी बरबादी टाळण्यासाठी महामहीम राज्यपाल महोदयांनी सांगितलेला उपाय हा योग्य असाच आहे.* मुंबईतील मुळ भूमिपुत्र असलेले आगरी कोळी यांनी आर्थिक राजधानी नको तर आम्हाला नैसर्गिक साधनं संपन्नता हवी आहे. *मुंबईतील राजकारणी आणि स्वार्थी उद्योगपतींनी मुंबईची लुटमार करून आर्थिक बळ निर्माण केले आहे* . या कारणास्तव मुळ भूमिपुत्राचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अस्तित्व नामशेष केले आहे. भूमिपुत्रांच्या जमिनीवर विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन संपत्ती हिरावून घेतली आहे. अशा आर्थिक राजधानीची आम्हाला गरज नाही.म्हणून *राज्यपाल महोदयांनी तसे निर्देश शासनाला देवून मुंबईतील सर्व उद्योगपती आणि मंत्रालय देखील मुंबई बाहेर हलवावे* .जेणे करून कला ,संस्कृती,परंपरा अशा विविधतेने नटलेली , नैसर्गिक साधन संपतीयुक्त मुंबई हि मुळ भूमिपुत्रांसाठी जिवंत ठेवावी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here