मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,विरार शहरातील मनवेलपाडा विभाग येथील कारगिल नगर मधील जयदीप शाळेच्या मागे पंचशिल अपार्टमेंट लगत असलेल्या मोठ्या नाल्याची सुरक्षा भिंत कोसळली होती.सुरक्षा भिंतीच्या बांधकाम संदर्भात सोसायटीतील रहिवाशांनी महानगरपालिका तसेच स्थानिक सत्ताधारी नगरसेवक यांच्याकडे लेखी स्वरूपात याविषयी माहिती दिली.पण तरीही काम होत नसल्याने रहिवाशांनी याविषयी मनवेलपाडा येथील शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय येथे धाव घेऊन श्री.उदय अ. जाधव यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख श्री.उदय अ. जाधव यांनी महानगरपालिकेकडे त्वरीत पाठपुरावा केल्यानंतर स्व:ता आयुक्त साहेबांच्या आदेशाने अभियंत्यांमार्फत नाल्याची पाहणी करून कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडुन सांगण्यात आले.पण मागील ०३ महिने झाले तरी कामकाजाची सुरुवात केली गेली नसल्याने अचानक झालेल्या अतिवृष्टी दरम्यान डोंगरातुन वाहुन येणार्या पावसाच्या पाण्याने उर्वरित सुरक्षा भिंत देखील खचून पडुन गेल्यामुळे आजुबाजुच्या इमारतींना धोका निर्माण झाला होता.त्या विषयाची गंभीर दखल घेत इमारती मध्ये राहणार्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणुन महानगर पालिकेकडुन करण्यात येणार्या कामाची वाट न पाहता विरार शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख श्री. उदय अरुण जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेनेने स्वखर्चाने नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे कामकाजास सुरुवात करून काही दिवसातच नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम पूर्ण केले.अशा प्रसंगात स्थानिक रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याने पंचशील अपार्टमेंट सोसायटीतील बि.नं.०२,०३,०४,०५ या सोसायटीतील रहिवाशांनी शिवसेनेचे व श्री.उदय अरुण जाधव यांचे जाहीर आभार मानले आहे.