वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: देवळा तालुक्यातील वासोळ येथील आदिवासी वस्तीत दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे.येथील गल्ल्यांमध्ये गटारी नसल्याने पावसाचे व इतर सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.सध्या परिस्थितीत दुर्गंधी होणे हे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्यामुळे याठिकाणी ग्रामपंचायतीने लक्ष देऊन तत्काळ भूमिगत गटारींची उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यासारख्या अनेक समस्या वेळोवेळी भेडसावत असताना ग्रामपंचायत उपाय योजना करण्याचे टाळाटाळ करत आहे असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.