नाशिक दि. 21 – नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी असे मृत्यूचे थैमान राज्यात इतर कुठेही पुन्हा घडू नये याची खबरदारी राज्य सरकार ने घ्यावी असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदासजी आठवले यांनी केले.ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटर वर असलेले 22 रुग्ण तात्काळ मृत्युमुखी पडले ही नाशिक ची घटना मन विदीर्ण करणारी आहे. या प्रकरणाची सखोल उच्च स्तरीय चौकशी केली पाहिजे.या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून निष्कळजीपणा बद्दल दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.राज्यातील सर्व रुग्णायलयात असणाऱ्या ऑक्सिजन टॅंकची देखभाल पाहणी करून ऑक्सिजन पुरवठयात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. ऑक्सिजन टॅंक दुरुस्ती कडे लक्ष द्यावे. टॅंक लिकेजमुळे इतकी भीषण घटना घडली या घटनेवरून संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण असून पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकार ने खबरदारी घ्यावी असे मत ना रामदासजी आठवले यांनी व्यक्त केली.रिपाई – आठवले ,सोशल मिडिया आयटी सेल उत्तर महाराष्ट्र प्रदेश..
Home Breaking News नाशिकमध्ये झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठया अभावी झालेले मृतांच्या नातेवाइकांना तात्काळ मदत...