प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे :- सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार(नातु)श्री सचिनभाऊ साठे यांनी लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार व लिखान समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने तसेच मानवहीत लोकशाही पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात मानवहीत लोकशाही पक्षाच्या कार्यकारिणीची निवड प्रकीया सुरू केलेली आहे.
मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.सचिनभाऊ साठे यांच्या आदेशावरून तसेच प्रदेशाध्यक्ष श्री.राधाकृष्णजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री.भागवत डोंगरे यांच्या सुचनेवरून औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री रमेशभाऊ सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याने प्रेरीत असलेले तसेच श्री सचिनभाऊ साठे यांचे समर्थक म्हणुन सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील श्रीमती रामलीला सैलानी जाधव यांची महीला तालुकाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली तर तालुक्यातील पांगरी येथील श्रीमती रेखाबाई भगवान शिंदे यांची सिल्लोड तालुका महीला सचिव म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
निवड झाल्याबद्दल औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष श्री अशोकराव कांबळे,सिल्लोड तालुका संपर्क प्रमुख श्री सखाराम आहिरे,तालुकाध्यक्ष श्री नानासाहेब गायकवाड,तालुकाउपाध्यक्ष श्री बाबुराव आहिरे,युवा तालुकाध्यक्ष श्री फकिरचंद तांबे,युवा उपाध्यक्ष श्री दादाराव साठे,तालुकाि सचिव श्री रवी दनके,युवा सचिव श्री रतन अंभोरे,तालुका कार्याध्यक्ष श्री विनोद जाधव,श्री संजय कांबळे,श्री एकनाथ शिंदे,श्री रमेश शेजुळ,श्री नितीन दनके,श्री नितीन सौदागर,श्री जनार्दन दनके आदी मिञ परिवार,समाजबांधव तसेच सोशल मिडीयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे,
Home Breaking News श्रीमती रामलिला जाधव यांची तालुकाध्यक्ष व श्रीमती रेखाबाई शिंदे यांची तालुका सचिवपदी...