पंतप्रधान मोदीजीं च्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने शिक्कामोर्तब केला आहे :- डॉ भारती पवार

0

राज्य : मागच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता आली होती. परंतु आता हे तिन्ही राज्ये भाजपकडे प्रचंड बहुमताने आली आहेत. तेथील जनतेचे व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.
केंद्रात सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान मोदीजी यांनी गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, आदिवासी, युवा, महील व कामगारांसह सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी वेगवेगळ्या जनकल्याण कारी योजना राबविल्या.त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि विश्वास आहे.या निकालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने शिक्कामोर्तब केला असून पुन्हा एकदा पंतप्रधानांना जनतेने पाठिंबा दिला आहे. पंतप्रधानांवर जेवढे आरोप केले. त्याला जनतेने निकालातून उत्तर दिले आहे तर येत्या चार, पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येईल असा विश्वास डॉ भारती पवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here