केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्था बाबत भेट: डॅा. भारती पवार

0

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट घेतली यावेळी चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहूल दादा आहेर उपस्थित होते.यावेळी चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाण पुलास 50 मी चे 5 स्पॅन देण्याबाबत तसेच रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड ) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत चर्चा करण्यात आली. दिंडोरी लोकसभा मतदार संघांतील देवळा तालुक्यातील महत्वाचा असलेला एन. एच ७५२ जी सटाणा-देवळा-मंगरूळ रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या भुसंपादित होणाऱ्या जमिनीच्या अडचणीं संदर्भात तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या साडे तीन पीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी गडावर जाणारा नाशिक दिंडोरी वणी रस्त्यास. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा व रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.तसेच दिंडोरी, पेठ,सुरगाणा या तालुक्यातील वाहन धारक स्थानिक जनतेला चाचडगाव टोलनाक्यावरून सवलत मिळावी यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग 848 हा दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातून गुजरात ला जाणा-या रस्त्यावरील कोटंबी व सावळघाटासह अनेक कामे प्रलंबित असताना टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाल्याने जनतेत प्रचंड रोष व्यक्त होत असुन त्यातच कामे न झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. तसेच टोल परिसरातील २० किलो मिटरच्या स्थानिक वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पास देण्यामागची व नियमित शेतमाल ने आण करणा-या स्थानिक शेतक-यांना टोल मध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी डॅा. पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली असता गडकरी यांनी देखील पेठ,सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील वाहनधारक जनतेस सवलती बाबत सकारात्मक विचार करू असे यावेळी सांगितले.
प्रस्तावित असलेला सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड रस्ता जमिन भुसंपादन व शेतक-यांना त्याबाबतचा योग्य मोबदला मिळण्याबाबत देखील मंत्री गडकरी यांच्याकडे डॅा. भारती पवार व डॅा. राहुल आहेर यांनी सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले निवेदनातील मागणी संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना नितीन गडकरी यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याने रोजगार निर्मीतीला चालना मिळेल तसेच जिल्ह्यातील कृषी माल इतर शहरांमध्ये पोहचण्यास मदत होईल असे गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here