मनमाड: शहरातील विविध भागांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून वारंवार खंडित वीज पुरवठा होत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक हैराण झाले होते. त्याचा तक्रारी आमदार कार्यालयात यात होत्या वारंवार होणारा खंडित होणारा विज पुरवठा बाबत आज शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्या आज महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे ऑफिस गाढले. या वेळी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता गेल्या काही दिवसांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली झाली असल्याने वीजपुरवठ्याकडे लक्ष देणे कर्मचाऱ्यांना झाले नाही पुढील दोन ते तीन दिवसात शहरातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून सर्व तक्रारीचे निवारण करून व वीज पुरवठा सुरळीत करू असे उत्तर कार्यकारी अभियंता संजय तडवी यांनी यापुढे असे होणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,बबलू पाटील,राकेश ललवाणी, अमिन पटेल, सुभाष मळवतकर उपस्थित होते.