मुंबई : युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बाकोलीया,महिला राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा कदम यांच्या सूचनेनुसार आज मुंबई टीम यांच्या वतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्रादिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ध्वजारोहण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले व करोना महामारी काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली त्यांना UHRC तर्फे सेवा योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला व लहान मुलांना बिस्कीट,खाऊ वाटण्यात आला त्यानंतर पर्यावरणाची काळजी धेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला व तेथेच समाजातील काही गरीब व गरजू लोकांना गृहोपयोगी वस्तूंचे (तांदूळ,मुगडाळ,तूरडाळ, साखर,चहा पावडर,हळद,मीठ,माचिस बॉक्स व इतर याची किट) किट वाटप करण्यात आले त्या प्रसंगी डॉ.दिव्याश्री राऊत, UHRC च्या महाराष्ट्र संघटक मंत्री सौ.सुजाता सावंत,मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री.अमोल वंजारे,मुंबई सहसचिव श्री.संदीप मोहिते,राजापूर तालुका अध्यक्षा सौ.दीप्ती कामेरकर,चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज,श्री.सुहास परब,दादर ब्लॉक अध्यक्षा सौ.प्रज्ञा चव्हाण,श्री.सचिन जोईजोडे,युवासेनेचे निकिता भोईटे,सदस्या अंजली भोसले,संजीव परमार,सौ.साक्षी कांबळे,मनीष पारधी,विवेक माने,महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अक्षय शिंगरे,संदीप वारीसे तसेच समाजसेवक गिरीश परब,मोरया बिल्डिंग पदाधिकारी निलेश वनगे,शशिकांत परब,विश्वजित येरम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Breaking News युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत. मुंबई टीम यांच्या वतीने भारताचा अमृत महोत्सवी...