पंजाब सरकार विद्यार्थ्यांकडून 2020-21 प्रवेश आणि शिक्षण शुल्क स्वीकारणार नाही

0

चंदीगड – कोरोना विषाणूचा प्रत्येक भागात परिणाम झाला आहे. शिक्षण क्षेत्रात कोरोनमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. आता पंजाब सरकारने 2020-21 शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश, पुन्हा प्रवेश आणि शिकवणी फीसाठी पैसे घेतले जाणार नाहीत असा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार कोरोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यातील सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणारया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 2020-21 या वर्षासाठी कोणत्याही विद्यार्थ्याकडून प्रवेश, पुन्हा प्रवेश किंवा शिकवणी फीच्या नावावर पैसे वसूल झाले नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील एक मोठा विद्यार्थी वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here