बीयाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी विशेष दक्षता बाळगावी_ कृषी विभागाचे आवाहन

0

जळगाव, दि. 1 (जिमाका) – खरीप हंगाम 2020 लवकरच सुरु होत असून. या हंगामासाठी बीयाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी विशेष दक्ष राहणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी बीयाणे खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातुनच बियाणे खरेदी करावे, बनावट / भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडुनच बियाणे खरेदी करून त्याचे पक्के खरेदी बिल दुकानदाराच्या स्वाक्षरीसह घेऊन बियाण्याचे पाकीट/ पिशवी हि सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करुनच खेरदी करा. बियाण्याची अंतिम मुदत पाहुनच बियाणे खरेदी करावे. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टण/ पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपुन ठेवावे. कोणत्याही खाजगी व्यक्तीकडून बियाणे खरेदी करु नये अथवा आमिषाला बळी पडू नये. खरेदी करीत असलेल्या बियाणे पाकिटावरील मजकुर व लॉट क्रमांक इत्यादी बरोबर असल्याची खात्री करावी. कमी वजनाची निविष्ठा/छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा इतर तक्रारींसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here