राहुरीच्या तनपुरे कारखाना निवडणुकीत माजी खासदार सुजय विखेपाटील ठरले किंग मेकर,शेटेचा काटा काढला अन लोकसभेचा हिशोब चुकता केला

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राहुरीच्या स्व.बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार सुजय विखेपाटील हेच खरे किंग मेकर ठरले असुन त्यांनी पडद्याआड राहून सर्व सुत्रे हलवून गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केलेल्या शेटेचा राजकीय काटा काढला आणि लोकसभेचा हिशोब चुकता केला.अशी राहुरी तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी भाजपच्या विरोधात काम केले त्यांचा हिशोब विधानसभा निवडणुकीतच चुकता केला आहे.पण त्यातून शेटे हे बाजूला राहिले होते त्यांचा हिशोब या निवडणुकीत चुकता केला. सुजयदादा विखे पाटील मिडिया समोर जरी आपला या निवडणुकीशी काहीही संबंध नाही असे म्हणत असले तरी जिल्ह्यातील धुरंधर नेत्यांच्या नजरेतून ही बाब आता लपून राहिलेली नाही.तसेच जिल्ह्यातील सर्व साखर सम्राटांनी अविधीलिखीत केलेल्या ठरावाची की जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना कोणीही राजकीय ताकद द्यायचीच नाही या गुप्त नियमांची अंमलबजावणी या निवडणुकीत केली गेली आहे.राहुरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राहुरी मार्केट कमीटीचे सभापती अरुणराव तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ,राजू शेटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ,आणि अम्रृत धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील कारखाना बचाव कृती समिती या तिन्ही पॅनेलमध्ये लढत झाली आणि सभापती अरुणराव तनपुरे, माजी खासदार प्रसादराव तनपुरे,माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्व २१ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केलेआहे.राजू शेटे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पाठिंबा मिळाला होता.पण ऐनवेळी विखे पाटील यांनी सुदर्शन चक्र फिरवून खेळी केली आणि शेटेंना धोबीपछाड देत लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला.लोकसभा निवडणुकीत राजू शेटे यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार निलेशजी लंके साहेब यांना उघड उघड मदत केली होती.विखेंचे कट्टर समर्थक युवा नेते उदयसिंह पाटील आणि देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी ऐनवेळी चुप्पी साधुन कारखाना निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहून विखेंच्या गुप्त आदेशाची अंमलबजावणी केली होती.कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवार विजयी झाले त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे सर्व साधारण मतदार संघ (कोल्हार गट)-ज्ञानेश्वर कोळसे(६९०९मते), अशोक उर्हे(७३२९मते), (देवळाली प्रवरा गट)-भारत वारूळे(६५५४मते), अरुण ढुस(६८७४मते), कृष्णा मुसमाडे(६७४७मते),(टाकळीमिया गट)-ज्ञानेश्वर पवार (६२१५मते),मिना करपे(६७३७मते), ज्ञानेश्वर खुळे(७०८१मते),(आरडगाव गट)-सुनिल मोरे(६७८६मते),प्रमोद तारडे (६९८३मते), वैशाली तारडे (६७११मते),(वांबोरी गट)-भास्कर ढोकणे(७३३३मते), किसन जवरे(७४२४मते), (राहुरी गट)-अरूण तनपुरे (६९४७), जनार्दन गाडे (६६७४मते),(अनुसूचित जाती जमाती मतदार संघ)-अरुण ठोकळे ( ७२३६मते),महीला राखीव मतदारसंघ -जनाबाई सोनवणे (६५६५मते),सपना भुजाडी(६७८६मते), (इतर मागासवर्गीय मतदारसंघ)-रावसाहेब तनपुरे (७१३७मते), (भटक्या विमुक्त जाती मतदार संघ)-अशोक तमनर (७५८७मते),(ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघ)-हर्ष तनपुरे (१२८मते)या प्रमाणे जनसेवा मंडळाने मते मिळवून विरोधकांची पळता भुई थोडी केली आहे. मतदारांनी जरी स्व.बाबुराव तनपुरे परीवाराच्या ताब्यात हा कारखाना दिला असला तरी एकेकाळी जिल्ह्यात एक नंबर असलेला हा साखर कारखाना आता फार डबघाईस आलेला आहे.कारखाना सुरळीतपणे चालवण्यासाठी नवीन संचालक मंडळाला फार मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.माजी खासदार,आमदार हा कारखाना सुरळीतपणे कसा चालवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.साखर कामगारांना वेळेवर देणे ही अतिशय मुश्कीलीची बाब मागिल पदाधिकारी मंडळाने करून ठेवली आहे.कारण जिल्ह्यातील अनेक रथी महारथींना हा साखर कारखाना चालविण्यास सपशेल अपयश आलेले आहे.नगरपरीषद, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्याने राहुरी तालुक्याच्या राजकारणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here