देशात कोरोना / सुप्रीम कोर्ट म्हणाले – प्रवासी मजुरांबाबत त्रुटी आहेत, केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी

0

नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी देशातील विविध भागात प्रवासी मजुरांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत स्वतः दखल घेतली. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, या प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारकडून चुका झाल्या. आता केंद्र व राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांच्या प्रवास, त्यांचे वास्तव्य आणि भोजन व्यवस्था यासाठी पावले उचलावीत असे सर्वाच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आंध्रात एका आठवड्यात संसर्गाचा वेग सर्वात कमी 2%, बिहारमध्ये सर्वाधिक 11%

देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 46 हजार 204 झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. यानंत तमिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि बिहारमध्ये आहे. यांपैकी मागील आठवड्यात सर्वात कमी वेग आंध्रप्रदेश आणि सर्वाधिक महाराष्ट्र वाढला. आंध्रप्रदेश दररोज सरासरी 2% रुग्ण वाढले आणि बिहारमध्ये 11% दराने रुग्णांत वाढ झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात 1 लाख 45 हजार 380 संक्रमित आहेत. यामधील 80 हजार 722 जणांवर उपचार सुरु आहेत. 60 हजार 490 बरे झाले असून 4167 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना दरम्यान केरळमध्ये परीक्षा सुरू

केरळमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तिरुअनंतपुरममध्ये परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सद्वारे रांगेत उभे करण्यात आले. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यापूर्वी सर्वांचे तापमानाचे तपासणी केली. सर्व विद्यार्थ्यांचे हात देखील सॅनिटाइज करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here